Showing posts with label चर्च. Show all posts
Showing posts with label चर्च. Show all posts

Monday, May 25, 2009

प्रभाकरन : पुन्हा जन्मेन "मी' (?)

चेन्नई येथील एका अभ्यासू पत्रकराने "तमिळ इलम-ख्रिश्चन अजेंडा' या विषयावर सविस्तर लेख लिहून चर्चच्या हस्तक्षेपावर प्रकाश टाकला आहे. या पत्रकाराच्या अभ्यासानुसार चर्चने एलटीटीईला संपूर्ण रसद आरंभापासून पुरविली आहे. त्याचवेळी श्रीलंका प्रशासनात सिंहली ख्रिश्चनांचा गट वाढेल यासाठी चर्च यशस्वी झाले. सदर लेखाचा प्रतिसाद अद्याप संबंधितांनी केलेला नाही. सोलोमन बंदरनायके, डॉन स्टीफन सेनानायके, जॉन कॉटेलवल, सिरिमॉव्ह बंदरनायके, ड्युडली सेनानायके, ज्युनिस रिचर्ड, जयवर्धने, प्रेमदासा, रानील विक्रमसिंघे, चंद्रिका बंदरनायके कुमारतुंगे, पर्सी महिंद्रा राजवक्ते हे श्रीलंकेचे राष्ट्रप्रमुख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ख्रिश्चॅनिटी संबंधित राहिले आहेत, अशी चर्चा आहे. या सर्वांवर चर्चचा पगडा आहे, याविषयी श्रीलंकेत बोलले जाते. यांचे जोडीदार ख्रिश्चन आहेत.

एलटीटीई प्रमुख प्रभाकरन्‌ याचा मृत्यू हे स्वतंत्र तमिळ प्रश्नावरचे अंतिम उत्तर नाही. प्रभाकरन्‌ याच्या मृत्यूने एक अध्याय संपला आहे. एलटीटीईच्या अतिरेकी कारवायांना पायबंद बसला आहे. त्यांचा श्रीलंकाविरोधी संघर्ष संपुष्टात आला आहे. मात्र तो पूर्णपणे समाप्त झाला आहे असे मानणे चूक ठेरल. प्रभाकरन्‌ याने स्वातंत्र्याची आकांक्षा, स्वतंत्र राष्ट्राची महत्त्वाकांक्षा व अस्मितेचा अहंकार फुलविला आहे. आपल्या उद्दिष्टांसाठी हिंसा व हिंसेला तत्त्वज्ञान एलटीटीईने मिळविले आहे. प्रभाकरन्‌ याच्या हत्येनंतर काही देशांतून झालेली आक्रमक निदर्शनं पुरेशी बोलकी आहेत. त्यामुळे प्रभाकरन्‌ रक्तबीज राक्षस ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. रक्तबीज राक्षसाच्या मृत्यूनंतर त्याच्या प्रत्येक थेंबातून एक नवा राक्षस जन्माला आला, अशी अख्यायिका आहे. प्रभाकरन्‌ याने नवे स्वातंत्र योद्धे आपल्या रक्तातून तयार होतील, याची पुरेशी काळजी घेतली असणार. त्यामुळे प्रभाकरन्‌ संपला, एलटीटीईचे युद्ध संपले, हा विद्यमान श्रीलंका सरकारचा आनंद फार काळ टिकणार नाही. श्रीलंकेपुढील आव्हान याहून कठीण आहे. कोणत्याही कारणाने नवा प्रभाकरन्‌ पुन्हा निर्माण होणार नाही, याची काळजी श्रीलंकेला घ्यावी लागेल. नव्याने जन्मलेल्या प्रभाकरन्‌ला मोठे होऊ न देणे व त्याला मिळणारी परकीय मदत रोखणे यासाठी कठोर उपाय करावे लागतील. मुख्य म्हणजे श्रीलंकेची "बौद्ध-हिंदू' ओळख टिकवून ठेवावी लागेल. साम्राज्यवादी, धर्मांतरणवादी परकीय ख्रिश्चन चर्च व जिहादी इस्लामला श्रीलंकेतील या सिंहली-तमिळ संघर्षाचा फायदा होणार नाही यासाठी श्रीलंका सरकारने दक्ष राहावे लागेल. या सर्व पार्श्वभूमीवर चेन्नई येथील एका अभ्यासू पत्रकराने "तमिळ इलम-ख्रिश्चन अजेंडा' या विषयावर सविस्तर लेख लिहून चर्चच्या हस्तक्षेपावर प्रकाश टाकला आहे. या पत्रकाराच्या अभ्यासानुसार चर्चने एलटीटीईला संपूर्ण रसद आरंभापासून पुरविली आहे. त्याचवेळी श्रीलंका प्रशासनात सिंहली ख्रिश्चनांचा गट वाढेल यासाठी चर्च यशस्वी झाले. सदर लेखाचा प्रतिसाद अद्याप संबंधितांनी केलेला नाही. सोलोमन बंदरनायके, डॉन स्टीफन सेनानायके, जॉन कॉटेलवल, सिरिमॉव्ह बंदरनायके, ड्युडली सेनानायके, ज्युनिस रिचर्ड, जयवर्धने, प्रेमदासा, रानील विक्रमसिंघे, चंद्रिका बंदरनायके कुमारतुंगे, पर्सी महिंद्रा राजवक्ते हे श्रीलंकेचे राष्ट्रप्रमुख प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ख्रिश्चॅनिटी संबंधित राहिले आहेत, अशी चर्चा आहे. या सर्वांवर चर्चचा पगडा आहे, याविषयी श्रीलंकेत बोलले जाते. यांचे जोडीदार ख्रिश्चन आहेत.
पाल्कच्या सामुद्रधुनीच्या दोन्ही बाजूस "ग्रेटर द्रविडनाडू'ची पहिली मागणी सॅम्युअल जेम्स वेल्लूपिल्लई चेल्वब्वकम या श्रीलंकन तमिळ नेत्याने केली होती. 1956 साली तत्कालीन पंतप्रधान सोलोमन वेस्ट रिडवे-बंदरनायके यांनी केलेल्या सिंहला कायद्याने पहिला तमिळविरोधी दंगा श्रीलंकेत झाला होता. अँटोन बालसिंघम्‌ जो रोमन कॅथॉलिक होता तोच प्रभाकरन्‌ याचा सल्लागार-मार्गदर्शक होता. जो एलटीटीईत उच्चपदावर होता.
85 टक्के हिंदू असलेल्या श्रीलंकेत चर्चने एलटीटीईच्या माध्यमातून सिंहली व तामिळ अशा वांशिक भाषिक वादातून उभी फूट निर्माण केली. ही फूट चर्चच्या स्वार्थासाठी होती असमूठा नवलाद, पोण्णमबलम्‌ तमनाथम्‌, पोळाबलम्‌ अरुणाचलम्‌ यांच्याविषयी बौद्ध धर्मात मोठा आदर आहे. यांच्या प्रयत्नामुळे "बौद्ध पौर्णिमा' श्रीलंकेत राष्ट्रीय सुट्टी म्हणून सुरू झाली. संपूर्ण देशाचे ख्रिस्तीकरण करण्याच्या योजनेचा चर्च अजेंडा श्रीलंकेत अतिशय बेमालूपणे राबविला जात आहे. या सगळ्या कारवाया तामिळनाडूतही केल्या जात आहेत. जयललिता व करुणानिधी हे तमिळनेते स्वत:च्या सोयीसाठी एलटीटीई चा मुद्दा वापरत आहेत. चर्च अतिशय खूबीने या दोनही राजकारण्यांचा वापर करून घेत आहे. चर्चला श्रीलंका आणि तामिळनाडू येथे ख्रिश्चनांची लोकसंख्या वाढवून "स्वतंत्र तमिळ ख्रिश्चन लॅण्ड' निर्माण करायची आहे. यासाठी एलटीटीई मधील तमिळ-ख्रिश्चन गट व श्रीलंका सरकारमधील सिंहला-ख्रिश्चन गट यांचे महत्त्व वाढवून सिंहला-तमिळ फूट यशस्वीपणे पाडली गेली. या फुटीनेच श्रीलंका सतत अशांत राहिला. सततच्या संघर्षात समाजजीवन विस्कटून गेले. अशा विस्कटलेल्या समाजजीवनाला सांभाळण्यासाठी चर्च पुढे सरसावले. चर्चने सेवेतून धर्मांतर केले आहे. श्रीलंकेत धर्मांतर विरोधी कायदा करण्यासाठी हिंदू अफेअर्स विभागाचे संधी मंत्री टी महेश्वरन्‌ यांनी पुढाकार घेतला होता. या कायद्यासाठी प्रस्ताव तयार करण्यासाठी श्रीलंकेतील बुध्दिस्ट-हिंदू नेते एकत्र आले होते, परंतु सदर कायदा अस्तित्वात येऊ नये यासाठी चर्चने श्रीलंका सरकारवर दबाव टाकला. धर्मांतराच्या विरोधात बौद्ध व हिंदू अल्पसंख्य- बहुसंख्य एकत्र येत आहेत. हे पाहून चर्चने मोठ्या खूबीने इंटररिलिजस कौन्सिलच्या स्थापनेवर भर दिला. अशी कौन्सिल निर्माण करणे हा चर्चच्या अख्रिस्ती (non chrishan countries) देशात चर्चपुरस्कृत "इंटरफेय डायलॉग्ज'चा भाग आहे. टी महेश्वरन्‌ हे रानील विक्रमसिंह मंत्रिमंडळात मंत्री होते. 2004 साली त्यांच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. मात्र जानेवारी 2008 मध्ये शिवमंदिरात महेश्वरन्‌ पूजा करीत असताना त्यांची हत्या करण्यात आली. श्रीलंका प्रशासनाने एलटीटीई व डग्लस देबण्डा यांना दोशी ठरविले. बीबीसी सिंहला डॉटकॉम च्या बातमीनुसार डीएनए चाचणीचा अहवाल त्यांच्याविषयी संशय व्यक्त होतो, त्यांच्याशी मिळताजुळता होता. तर श्रीलंकन ज्युडीनयरीनुसार सुरक्षा रक्षकाने ठार केलेला हल्लेखोर जॉन्सन कॉलीन वसंयन्‌ व्हॅलेंटिन हा होता. ही घटना चक्रावून टाकणारी आहे. अशा अनेक घटना सिंहला-तमिळ वाद सुरू राहावा यासाठी घडविल्या गेल्या असे अभ्यासकांचे मत आहे.
पोर्तुगीज, डच, व ब्रिटिश राजवटीच्या काळात श्रीलंकेत ख्रिश्चॅनिटीने प्रवेश केला. वसाहतींचे राज्य गेल्यावरही चर्चने स्थानिकांच्या आधारे आपले प्रभुत्व वाढविण्यास सुरुवात केली. एका माहितीनुसार "मेनस्ट्रीम' चर्चेसनी "न्यू ख्रिश्चन' चर्चपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली आहे. मेनस्ट्रीम चर्चेसमध्ये श्रीलंकेत कॅथॉलिक व अँग्लीकन्स यांचा समावेश होतो. यांना "ओल्ड' चर्चेस म्हणूनही ओळखले जाते. हे चर्च बौद्ध व हिंदू धर्मीयांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवतात. मात्र न्यू चर्चेस व बौद्ध भिखू यांच्यात धर्मांतरणामुळे वाद होतात. या वादात पोलीस प्रशासन योग्य भूमिका घेत नाहीत, असे बौद्ध भिखूंचे म्हणणे आहे. एका बौद्ध भिखूच्या मते विविध मिशनरी संस्था श्रीलंकेत कार्यरत आहेत. या संघटना बौद्धांचे धर्मांतर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. श्रीलंकेत भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. यातूनच "प्रभाकरन्‌' फिरूनी पुन्हा जन्मेन मी ! या आशेने मृत्यूला सामोरा गेला असावा. चर्चच्या जगभरातील अख्रिस्ती देशातील कारवाया व त्यांचा अजेंडा लक्षात येण्यापूर्वी त्यांचे हेतू साध्य झालेले असतात, असा इतिहास आहे.
- मकरंद मुळे
ारज्ञ2244ऽसारळश्र.लेा